गुरुवार, 16 फ़रवरी 2017

योगसूत्र Sadhana पाद सूत्र 1-25 and 40-55

योगसूत्र  Sadhana पाद
 Author -- Dr Balram Sadashiv Agnihotri
Typed by Prachi -- To proof read

पात्तञ्जल योगसूत्रः अध्याय२
तपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रियायोगः।।१।।
ज्या योगात कायिक,वाचिक व मानसिक क्रिया केल्या जातात त्यास क्रियायोग अशी संज्ञा आहे या क्रियायोगात ध्यानाचा संबध येत नाही तप करणे स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान (ईश्वराची भक्ति) यांस क्रियायोग म्हणतात.
तप हे तीन प्रकारचे आहे तथापि,तपांत मन व इन्द्रिय यांचे ऐकाग्य्र साधलेच गेले पाहिजे कारण मनसच्श्रन्द्रियाणां च ऐकाग्य्रं तप उच्यते। अशी तपाची व्याख्या अग्निपुराणांत आहे मंत्राने जप करणे तज्जपः तदर्थभावनम् हे वाचिक तप आहे मन हे राग, वासना, तृष्णा रहित करणे हे मानसिक तप आहे व्यासांनी भाष्यांत प्रणवादिपवित्राणां जपः ह्याचा जो अन्तर्भाव स्वाध्यायात केला आहे त्याचादेखील तपात अन्तर्भाव करावयास पाहिजे अर्थात् मोक्षशास्त्राचे अध्ययन हे वाचिक तप आहे स्वाध्याय म्हटल्याबरोबर जशी मोक्ष शास्त्राध्यायनाची कल्पना समोर येते तशी जपाची चर्चा भगवदगीतेत खालीलप्रमाणे आहेः
देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम्।
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते।।
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाडःमयं तप उच्यते।।
मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते।।
स्वाध्याय म्हणजे मोक्षशास्त्राचे अध्ययन.याच स्वाध्यायांत मोक्षशास्त्राच्या अध्यापनाचाही अन्तर्भाव होतो.ईश्वरप्राणिधान म्हणजे आपल्या सर्व क्रिया ईश्वरार्पण बुद्धिने करणे ईश्वरप्राणिधानं सर्वक्रियाणां परमगुरावर्पणम्, तत्फलं संन्यासो वा।
समाधिभावनार्थः क्लेशतनूकरणार्थश्च।।२।।
प्रथम सूत्रात जो क्रियायोग सांगितला आहेत्याचा उपयोग योग्यास निर्बीज समाधी साधावयाची आहे ही भावना उद्दिपित करण्याकडे होतो व सूत्र तीन मधे जे क्लेशांचे प्रकार दिले आहेत ते कमी होत संपूर्ण नाहिसे करण्याकडेदेखील क्रियायोगाचा उपयोग होतो. एतदुक्तं भवति एते तपःप्रभृतयो भ्यस्यमानाश्चित्तगतान्नविद्यादीन्लेशा़ञ्छिथिलीकुर्वन्तः समाधेरुपकारकतां भजन्ते। तस्मात्प्रथमं क्रियायोगावधानपरेण योगिना भवितव्यमित्युपदिष्टम्।
अविद्यास्मितारागद्वेषाभिनिवेशाः क्लेशाः।।३।।
क्लेश, जे कमी करीत संपूर्ण नाहिसे करावयाचे ते पाच प्रकारचे आहेतः अविद्या, अस्मिता, राग, द्वेष व अभिनिवेश.
अविद्याक्षेत्रमुत्तरेषां प्रसुप्ततनुविच्छिन्नोदाराणाम्।।४।।
उत्तरोत्तर कथन केलेले जे अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश नामक क्लेश हे प्रसुप्त(सुप्तावस्थेत) असोत, तनुविच्छिन्न अथवा उदार अवस्थेत असोत, या सर्वांची प्रसवभूमि (या सर्वांना उत्पन्न करणारी) अविद्या आहे. अविद्येपासून उत्पन्न होणारा अस्मिताक्लेश प्रसुप्त, तनु, विच्छिन्न व उदार या स्वरुपात कसा असतो तर अस्मिता ज्या वेळी बीजभावांत असते त्यावेळी तिला प्रसुप्त म्हणतात.ती त्यावेळी कार्य करीत नसते. केवळ अस्तित्वमात्र असते. या नामार्थक्रियां कार्षुःक्लेशा विदेहप्रकृतिलयानां बीजभावं प्राप्तास्तु ते शाक्तिमात्रेण सन्ति क्षीर इव दधि। तथापि, अस्मितेचे शक्तिमात्राने राहाणे तनु भावास प्राप्त होते त्यावेळी ती वासना रुपाने असते.क्लेश हे प्रतिपक्षभावनेने नेहमी पनु भावास (क्षीणभावास) प्राप्त होतात. या प्रतिपक्ष भावनेचे स्वरुपकथन करणारे सूत्र पुढे आहे. जेव्हा अस्मिता प्रवृत्ती, निवृत्ती भावास प्राप्त होते(जसे हे मी केले ही निवृत्ती,हे करावयाचे आहे ही प्रवृत्ती.) तेव्हा ती विच्छिन्न स्वरुपाची असते.योग्य सहकारी प्राप्त झाल्याबरोबर जेव्हा अस्मिता प्रत्यक्ष कार्याला लागते तेव्हा ती तिची उदारावस्था. जशा अस्मितेच्या चार अवस्थांचे स्वरुप या प्रमाणे आहेः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः। हे अस्मितेचे प्रसुप्तस्वरुप.
आशपाशशतैर्बध्दा व कामोपभोगपरायणा ही अस्मितेची तनु-अवस्था. अनेक चित्तविभ्रान्तत्व व मोहजालसमावृतत्त्व ही अस्मितेची विच्छिन्नावस्था आणि कामभोगप्रसक्तत्व ही उदारावस्था.या अस्मितादिक चारही क्लेशांच्या ज्या अवस्था आहेत ह्यांचे बीज अविद्या आहे.
अनित्याशुचिदुःखानात्मसु
नित्यशुचिसुखात्मख्यातिरविद्या।।५।।
अनित्य,अशुद्ध,दुःखात्मक,अनात्मास्वरुप असे जे दुःखजाल आहे त्या सर्वांबद्दल हे नित्य आहे,शुद्ध आहे,हे सुखाचे साधन आहे, हेच आत्मस्वरुप आहे,असे ज्ञान असणे ही अविद्या होय.'एतद् प्रतिपादनं भवति अनित्येषु घटादिषु नित्यत्वाभिमानोविद्येत्युच्यते। एवमशुचिकायादिषु शुचित्वाभिमानः, दुःखेषुच विषयेषु च सुखत्वाभिमानः,अनात्मने शरीरे आत्मत्वाभिमानः।एतेनापुण्ये पुण्यभ्रमोनर्थेचार्थ भ्रमो व्याख्यातः।' ख्याति याचा अर्थ ज्ञान अध्यासाचे लक्षण शांकरभाष्यांत 'अन्यत्रान्यधर्मः' असे केले आहे व अध्यास आणि अविद्या यांचे समानत्व दाखविले आहे.'तमेतमेवलक्षणमध्यासं पण्डिता अविद्येति मन्यते।'
द्दगदर्शनशक्त्योरेकात्मतेवास्मिता।।६।।
परस्पर अत्यन्त भिन्न स्वरुपाच्या असलेल्या ज्या दोन द्दकदर्शनशक्ति,त्यांच्या एकतेचा जो अभिमान त्याला अस्मिता म्हणतात.अविद्येमुळे उत्पन्न होणा-या अस्मितेचे वर्णन शांकरभाष्यात खुलाशाने दिलेले आहे. 'तद्यथा पुत्रभार्यादिषु विकलेषु सकलेषु वाहमेव विकलः सकलोवेति बाह्मधर्मानात्मन्यध्यस्यति तथा देहधर्मामन् तथेन्द्रियधर्मान् एवमयमनादिरनन्तो नैसर्गिकोध्यासः सर्वलोकप्रत्यक्षः। सत्त्व पुरुषयोरहमस्मीत्येकताभिमानोस्मिता।'
सुखानुशयी रागः।।७।।
पूर्वी अनुभवलेल्या विषयाचे जे सुख त्या सुखानुस्मृतिपूर्वक विषयसुखाबद्दल जी अभिलाषा अगर तृष्णा त्यालाच राग म्हणजे आसक्ति म्हणतात.'सुखे तत्साधने वा तत्त्वेन गृहीते तृष्णारुपःक्लेशो राग इत्यर्थः'
दुःखानुशयी द्वेषः।।८।।
पूर्वी अनुभवलेल्या दुःखाविषयी तदनुस्मृतिपूर्वक व निंदापूर्वक जो क्रोध,त्या क्लेशास द्वेष ही संज्ञा आहे. दुःखे तत्साधने तत्तेन गृहीते यःक्रोधः सद्वेषः।
स्वरसवाही विदुषोपि तथारुढो़भिनिवेशः।।९।।
स्वरसवाही याचा अर्थ स्वभावेन वासनारुपेण वहनशीलो न पुनरागन्तुकः। आत्मा हा त्याच्या चैतन्य अंशाने पण वासनेने बद्ध होऊन प्रवाह रुपाने सारखा जन्मामागून जन्म घेत असतो म्हणून त्यास स्वरसवाही म्हटले आहे.हा आत्मा जेव्हा शरीरधारी असतो तेव्हा आपण कधीही मृत होऊ नये (अर्थात् आपला शरीराशी संबंध सुटू नये)असे त्या आत्म्यास नेहमी वाटते हा त्याचा अभिनिवेश.यासच त्या आत्म्याची तीव्र मनीषा असे म्हणता येईल.ही तीव्र इच्छा (अभिनिवेश,आपण मरु नये ही इच्छा) अगदी सूक्ष्म जतुपासून ते विद्वानापर्यंत असते व हा अभिनिवेश सर्व प्राणीमात्रात अगदी रुढ(रुळलेला-खिळलेला)असतो. हा अभिनिवेशदेखील एक प्रकारचा क्लेशच आहे. पूर्वजन्मानुभूत मरणदुःखानुभव वासना बलाद् भयरुपःसमुपजायमानःशरीरविषयादेमर्म वियोगो मा भूदित्यन्वहमनुबन्धरुपः सर्वस्यैवा कृमेर्ब्रह्मपर्यंतं निमित्तमन्तरेण प्रवर्तमानोभिनिवेशाख्याःक्लेशः। अशी भोजवृत्ति आहे.विद्वानाच्या ठिकाणीदेखील हा अभिनिवेशात्मक क्लेश असतो असे का म्हटले?तर यावर उत्तर असे की विद्वान याचा अर्थ ज्याने संप्रज्ञात,असंप्रज्ञात समाधिचा लाभ घेतला आहे असा योगी हा न घेता ज्याच्या ठिकाणी केवळ श्रुतानुमित विवेकच आहे असा शब्दपण्डित एवढाच अर्थ करावा.अशा शब्दपण्डिताच्या बुद्धीत मी मृत होऊ नये हा अभिनिवेश असतोच.
ते प्रतिप्रसवहेयाःसूक्ष्म।।१०।।
सूक्ष्मक्लेश हे वासनारुपाने नेहमी अवस्थित असतात.जेव्हा वृत्तिरुपाने परिणत होतात त्यावेळी प्रत्यक्ष अर्थात् पुरुषावर आघात करणारे असतात.हे जे सूक्ष्म क्लेश आहेत ते ज्या कारणापासून (अंहकारापासून) उत्पन्न झाले त्या कारणात लय केल्याने त्यांचा त्याग होतो.
प्रतिप्रसव म्हणजे कार्याचा कारंणात लय
प्रतिप्रसवःनामा कार्यस्य चित्तस्यास्मितालक्षकारणभावापत्याक्लेशा हातव्य इति।
ध्यानहेयासदवृत्तयः।।११।।
हे सूक्ष्म क्लेश जेव्हा वृत्तिरुपाने स्थूलभावात प्राप्त होतात त्यावेळी त्यांच्या त्याग ध्यानाने करावा (सूक्ष्माःक्लेश ये वासनारुपेणैवस्थितास्तेषां क्लेशानामारब्धकार्याणां याः सुखदुःखमोहात्मिका वृत्तयस्ताः ध्यानेनैव चित्तैकाग्रतालक्षणेन हेया हातव्या इत्यर्थः)
क्लेशमूलः कर्माशयो द्दष्टाद्दष्टजन्मवेदनीयः।।१२।।
कर्माचा आशय म्हणजे साठा.हा कर्माचा आशय चित्तावर वासना संस्कार रुपाने असतो.ह्या कर्माशयाला मूळ कारण क्लेश आहेत.जे पाच क्लेश सांगितले ते कर्माच्या आशयाला कारण आहेत.असा हा क्लेशमूलक (क्लेशापासून उत्पन्न होणारा)जो कर्माचा साठा आहे  तो द्दष्ट म्हणजे चालू जन्म अथवा अद्दष्ट म्हणजे पुढे येणारा जो जन्म त्या जन्मात अनुभविला जातो. (प्रत्ययास येतो)थोडक्यात, या अगर पुढच्या जन्मी जी सुखदुःखे अनुभवाला येतात अगर येतील त्यांना कारण काहीतरी कर्माचा साठा आहे असे जाणावे.हा कर्माचा साठा नेहमी अविद्या, अस्मिता, रागद्वेषाभिनिवेश या क्लेशांनी तयार होतो.'कर्मणां शुभाशुभानां क्लेशा एव निमित्तम्।'
सति मूले तद्विपाको जात्यायुर्भोगाः।।१३।।
मूल कारण अविद्यादिक पाच क्लेश असतानाच जेव्हा ते विपाक दशेला म्हणजे कर्माची फळे देण्याच्या योग्य स्थितीला पोहोचतात तेव्हा जाती (विशिष्ट योनी अगर कुळात जन्माला येणे)आयुष्य (विशिष्ट काळ जिवंत राहणे) व भोग (विषयसुखांचा अनुभव घेणे) ही उत्पन्न होतात. क्लेशेष्वनभिभूतेषु सत्सु कर्मणां कुशलाकुशलरुपाणां विपाकः फलं जात्यायुर्भोगा भवन्ति। इदमत्र तात्पर्यम् - चित्तभूमावनादिकालसंतचिताः कर्मवासना यथा यथा पाकमुपयान्ति तथा तथा गुणप्रधानभावेन  स्थिता जात्यायुर्भोगलक्षणं स्वकार्यमारभन्ते।
ते ह्लादपरितापफलाःपुण्यापुण्यहेतुत्वात् ।।१४।।
पुण्य म्हणजे कुशलकर्म अपुण्य म्हणजे पाप.पुण्य अर्थात् कुशल कर्म असेल तर त्याचे फल सुखप्राप्तीत होते व पाप असेल तर त्याचे फल दुःखानुभूतीत होते.'पुण्यकर्मारब्धा जात्यायुभोगाह्लादफला अपुण्य कर्मारब्धास्तु परितापफलाः। एतच्च प्राणिमात्रापेक्षया द्वैविध्यम्'
परिणामतापसंस्कारदुःखैगुणवृत्तिविरोधाच्च
दुःखमेव सर्वं विवेकिनः।।१५।।
चौदाव्या सूत्रात पुण्यकर्माशयापासून सुख होते असे जरी सांगितले असले तरी विवेकी पुरुषाला हे सर्व दुःखमय आहे. कारण जरी विषयापासून पुरुषाला सुख होते तरी त्याच्या चित्तावर होणारा परिणाम म्हणजे विषयासंबंधी तृष्णा वाढणे हा आहे व हा परिणाम दुःखद आहे. ह्यास परिणामदुःख म्हणतात. विषयसुखासाठी असणारा जो राग(अभिलाषा) त्याच्याच साहचर्याला द्वेष असतो.अर्थात विषयाभिलाषा पूर्ति झाली नाही की द्वेष, क्रोध, मत्सर हे उत्पन्न होतात.यास तापदुःख म्हणतात. उपभुज्यमानेषु सुखसाधनेषु तत्प्रतिपन्थिं प्रतिद्वेषस्य सर्वदैवावस्थितत्वात्सुखानुभवकाले पि तापदुःखं दुष्परिहरमितितापदुःखता। अशी भोजवृत्ती आहे.
सुखाचा अनुभव घेतल्यापासून सुखसंस्कार व दुःखाचा अनुभव घेतल्यापासून दुःखसंस्कार चित्तावर राहतात व या संस्कारांपासून कर्माशय हा सारखा वाढतच राहतो.म्हणून दोहोतही संस्कारदुःख असतेच, यामु्ळे नेहमी बध्दताच कायम राहते. शिवाय सत्त्व, रज, तम या गुणांचा परस्पर विरोध आहेच व यांच्या सुखदुःख मोहात्मक अशा ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती एकमेकांचा सारखा पराभव करुन प्रकट होतच असतात. म्हणून सर्व कर्मविपाक दुःखस्वरुपच आहे. त्याचा त्याग करावा असे म्हटले आहे.
हेयंदुःखमनागतम् ।।१६।।
जे दुःख अद्याप आलेले नाही ते दुःख टाकता येते. जे येऊन गेले ते भोगून संपले, जे दुःख आहे ते त्याक्षणी भोगारुढ असते. ते भोगल्याशिवाय नाहीसे होत नाही.म्हणून जे अनागत आहे तेच हेयास (टाकण्यास) योग्य असते.
द्रष्टदृश्ययोः संयोगो हेयहेतुः।।१७।।
द्रष्टा जो चिद्रूप पुरुष व द्दश्य असे जे बुद्धिसत्त्वावर आरुढ होणार सर्व जडजातधर्म या दोहोंचा(भोक्ता पुरुष व भोग्य जडजात यांचा) अविवेकख्याति-पूर्वक होणारा जो संयोग तो या हेयाचे अर्थात दुःखाचे, (गुणपरिणामस्वरुप संसाराचे) मूळ कारण आहे. अविवेकख्याति म्हणजे अज्ञान.
प्रकाशक्रियास्थितिशीलं भूतेन्द्रियात्मकं भोगापवर्गार्थं द्दश्यम्।।१८।।
जे द्दश्य आहे ते प्रकाश म्हणजे सत्त्वगुणात्मक, क्रिया म्हणजे रजोगुणात्मक व स्थिती म्हणजे तमोगुणात्मक आहेत.शिवाय हे दृश्य भूतेन्द्रियात्मक आहे. भूते ही स्थूल पंचमहाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश व सूक्ष्म म्हणजे तन्मात्रात्मक,अर्थात गन्धतन्मात्र, रसतन्मात्र, रुपतन्मात्र, स्पर्शतन्मात्र व शब्दतन्मात्रात्मक या स्वरुपाची आहेत.इन्द्रिये ही पंचज्ञानेन्द्रिये, पंचकर्मेन्द्रिये व मन अशी आहेत शिवाय दृश्य हे भाग व अपवर्ग देणारे आहेत. दृश्याचे भोगस्वरुप सूत्र २.१३ यात सांगितले आहे अपवर्ग म्हणजे मोक्ष. ज्यावेळी विवेकख्यातिपूर्वक (म्हणजे ज्ञानाने) संसाराची निवृत्ती होईल तेव्हा मोक्ष मिळेल हे दृश्य, भोग व अपवर्ग दोन्हीही साधून देते. अविवेकख्यातिपूर्वक दृश्य भोगास प्रवृत्त करते व विवेकख्यातिपूर्वक दृश्य मोक्षास प्रवृत्त करते
तौभोगापवर्गौ अर्थः प्रयोजनं यस्य तत् तथाविधं दृश्यमित्यर्थः।
 विशेषाविशेषलिङ्गमात्रालिङ्गानि गुणपर्वाणि।।१९।।
सत्त,रज, व तम हे जे तीन गुण आहेत, यांच्या चार अवस्था आहेतः पहिली विशेषावस्था ही अवस्था पंचमहाभूते व एकादश इन्द्रिये (पाच ज्ञानेन्द्रिये पाच कर्मेंन्द्रिये व मन) अशा सोळा विकारांची असते. सांख्यकारिकेत या विशेष अवस्थेसच षोडशकस्तुविकारः असे म्हटले आहे दुसरी अविशेषावस्था म्हणजे पंचतन्मात्र (शब्दतन्मात्र, स्पर्शतन्मात्र, रुपतन्मात्र, रसतन्मात्र व गन्धतन्मात्र) व अहंकार तिसरी लिंगावस्था म्हणजेच बुद्धी यासच महत् असे नाव आहे चवथी अलिंगावस्था आहे यासच मूळ प्रकृती, अव्यक्त, प्रधान ही नावे आहेत विशेषामहाभूतेन्द्रियाणि। अविशेषास्तन्मात्रान्तः करणानिः लिङमात्र बुद्धिः। अलिङम अव्यक्तमित्युक्तम्।
द्रष्टा दृशिमात्रः शुद्धोपि प्रत्ययानुपश्यः।।२०।।
द्रष्टा म्हणजे पुरुष हा दृशि म्हणजे चैतन्यमात्र व शुद्ध असूनसुद्धा विषयाचे जे ज्ञान त्याच्याशी बुद्धिवृत्तिने हा तादात्म्य झालेला दिसतो. एतदुक्तं भवति, जातविषयोपरागायामेव बुद्धौ सन्निधिमात्रेणैव पुरुषस्य द्रष्टृत्वमिति।
तदर्थ एव दृश्यस्यात्मा।।२१।।
दृश्याचे जे पुर्वी संगितलेले स्वरुप केवळ त्याच्याच म्हणजे दृश्यासाठी नसून ते पुरुषाला भोक्तृत्व व अपवर्ग संपादन करुन देण्यासाठी आहे आत्मा म्हणजे स्वरुप दृश्य हे स्वतःच्या प्रयोजनासाठी प्रवृत्त होत नसून पुरुषाच्या भोगासाठी आहे. नहि प्रधानं प्रवर्तमानमात्मनः किंचित् प्रयोजनमपेक्ष्य प्रवर्तते किन्तु पुरुषस्य भोगं भोक्तृत्वंच सम्पादयाति।
कृतार्थं प्रति नष्टमप्यनष्टं तदन्यसाधारणत्वात्।।२२।।
जो पुरुष कृतार्थ आहे म्हणजे ज्याला कैवल्य प्राप्त झाले  त्याच्या दृष्टीने हे सर्व दृश्य, जडजगत् , नाहिसे झाल्यासारखे आहे कारण हे जगत्  नी त्याच्या भोगासाठी ना अपवर्गासाठी तथापि कृतार्थ पुरुषाहून अन्य साधारण पुरुष आहेत त्यांच्यासाठी मात्र हे जग अनष्ट आहे या सूत्रात शंकराचार्यांचा मायावाद कोणत्याही रुपाने प्रतीत होत नसून उलट जगताची सत्सता मात्र प्रत्यास येते यासंबंधी भोजवृत्ती म्हटले आहे कृतार्थपुरुषं प्रति तन्नष्टं तथापि सर्व पुरुषसाधारणत्वादन्यान्प्रत्यनष्टमेवावतिष्ठते। अतः प्रधानस्य सकल भोक्तृसाधारणत्वान्न कदाचिदपि विनाशः। एकस्य मुक्तौ वा न सर्वमुक्ति प्रसंगः। या सूत्रात दाखला म्हणून दारु पिणा-याचे उदाहरण घेऊ. दारु पिणा-याने पूर्णपणे दारु सोडली तर त्याच्या दृष्टीने जरी दारु सर्वस्वी नष्ट झाली असली,(कारण तिचे वर्जन केल्यामुळे तिच्यापासून  सर्वथैव भोगाची अपवृत्ति झाली आहे) तरी त्या पुरुषाहून अन्य असे जे दुसरे दारु पिणारे आहेत त्यांच्या दृष्टीने दारु नष्ट झाली नाही तर तिला वस्तुनिष्ठ सत्यत्व आहे. त्याचप्रमाणे दृश्य जगताला वस्तुनिष्ठ सत्यत्व आहे.
स्वस्वामिशक्तयोः स्वरुपोपलब्धिहेतुः संयोगः।।२३।।
यदेव भोगस्य भोग्यत्वं भोक्तृश्च भोक्तृत्वनादिसिद्धं स एव संयोगः।
स्व म्हणजे दृश्य व स्वामि म्हणजे पुरुष. या द्रष्टृदृश्याचा जो संयोग तो संयोग कशासाठी आहे तर द्रष्टयाला आपल्या स्वरुपाची उपलब्धि म्हणजे जाणीव व्हावी म्हणजेच त्यास मोक्ष म्हणजेच त्यास मोक्ष-अपवर्ग मिळावा व त्याच्याबरोबर दृश्याचेपण योगस्वरुप कळावे यासाठी हा स्व म्हणजे दृश्यशक्तिचा व स्वामी म्हणजे पुरुषाचा संयोग आहे.
तस्य हेतुरविद्या ।।२४।।
मोहरुपाविद्या सा संयोगस्य कारणम्। हा जो संयोग आहे त्याला हेतू (कारण) अविद्या आहे.
तदभावे संयोगाभावो हानं तद् दृशेः कैवल्यम्।।२५।।
अविद्येचा अभाव झाला म्हणजे संयोगाचा अभाव होतो. ह्यालाच दृश्याचे हान (दृश्याला टाकून देणे - दृश्याशी संबंध न ठेवणे) म्हणतात व हेच दृशिस्वरुप जो पुरुष त्याचे कैवल्य म्हणजे त्या पुरुषाची मोक्षावस्था आहे या सूत्रात ज्ञानानेच अविद्येचा नाश होतो व ते यथार्थ ज्ञान होण्यासाठीच अन्य यमनि
  


भोजवृत्ती या सूत्राचे फार उत्तम स्पष्टीकरण आहे ते असे- न केवलं भोगसाधनपरिग्रह एव परिग्रहो यावदात्मनःशरीरपरिग्रहोपि परिग्रहाः।भोगसाधनत्वाच्छरीरस्य!तस्मिन्सति रागानुबन्धाद्बहिर्मुखायामेव प्रवृत्तौ न तात्विक ज्ञानप्रादुर्भावः!
'यदा पुनः शरीरादि परिग्रहनैरपेक्ष्येण माध्यस्थमवलम्बते तदामध्यस्थस्य रागादित्यागात्सम्यग्ज्ञानहेतुर्भवत्येव पूर्वापरजन्मसंबोधः।'
शौचात्स्वाङ्जुगुप्सा परैरसंसर्गः।।४०।।
अन्तर्बाह्य शुद्धी (शूचिर्भूतपणा) पाळल्यामुळे त्या मनुष्यास स्वतःच्या अंगाविषयी एक प्रकारचा तिटकारा उत्पन्न होतो. 'काय हे शरीर घाणीचे आगर आहे!' अशी बुद्धी उत्पन्न होऊन स्वतःच्या शरीराविषयी किळस येते व तो दुस-याला शरीरधारी जनाबरोबर संसर्ग ठेवीत नाही.जुगुप्सा=घृणा
'यःकिल स्वमेव कायं जुगुप्सते तत्तदद्यदर्शनात्, स कथं परकीयैस्तथाभूतैः कायैः संसर्गमनुभवेत!!' 
सत्त्वशुद्धिसौमनस्यैकाग्य्रेन्द्रियजयात्मदर्शनयोग्यत्वानि च।।४१।।
हे सूत्र ४० या सूत्राचाच अवयव असून 'भवन्ति' हे क्रियापद धरुन वाक्यपूर्ती करीवी. शुचिर्भूतपणा अंगी बाळगल्याचा योगाने रज व तमोगुण नाहिसे होऊन चित्तात सत्त्वगुण वाढतो. मन प्रसन्न राहते.चित्ताची एकाग्रता सत्त्वर होते. इन्द्रियांवर अंकुश राहातो व आत्मदर्शनास योग्य असे वातावरण निर्माण होते.
संतोषदनुत्तमः सुखलाभः।।४२।।
संतोषवृत्ती बळावल्यामुळे योगेयास अनुत्तम (अतिशय मोठया) सुखाचा लाभ घडतो.अन्तर्मुख वृत्तिही संतोषामुळे प्राप्त होते. या वृत्तिबरोबरच बाह्य विषयसुखाची अभिलाषा नाहिशी होते व अनुत्तम आन्तर् सुखाचा लाभ योग्यास होतो.'सन्तोष प्रकर्षेणान्तरं सुखमाविर्भवति, यस्य बाह्य सुखं लेशेनापि न समम्।।'
कायेन्द्रियसिद्धिरशुद्धिक्षयात्तपसः।।४३।।
तपामुळे अशुद्धिता क्षय होऊन कायसिद्धि व इन्द्रियसिद्धि प्राप्त होतात. (कायसिद्धि म्हणजे शरीराने लहान, मोठे होणे या प्रकारची सिद्धी व इन्द्रियसिद्धि म्हणजे अगदी दूरचे दिसणे,दूरचे ऐकू येणे या प्रकारची)
स्वाध्यायादिष्ट देवतासंप्रयोगः।।४४।।
अभिप्रेत जपसाधनेमुळे अथवा मोक्षशास्त्राच्या अध्ययनामुळे तत्तद् मन्त्ररुपी ज्या इष्ट देवता आहेत त्या देवतेशी संप्रयोग होतो. त्या देवता प्रत्यक्ष प्रगट होतात अथवा त्यांचा अनुग्रह होतो.'सा देवता प्रत्यक्षाभवति।' संप्रयोग याचा अर्थ संबंध जुळवणी असा आहे.
समाधिसिद्धिरीश्वरप्रणिधानात्।।४५।।
ईश्वरप्रणिधानामुळे (ईश्वराप्रत सर्व कर्म अर्पण केल्यामुळे) समाधिची सिद्धि (समाधिलाभ) लवकर प्राप्त होतो. भोजवृत्तीत या सूत्राचा अर्थ असा 'ईश्वरे यत्प्रणिधानं भक्तिविशेषः (तस्मात्) स भगवानीश्वरः प्रसन्नः सन्नन्तरायरुपान् क्लेशान्परिह्रत्य समाधिं संबोधयाति।'
स्थिरसुखमासनम्।।४६।।
स्थिर याचा अर्थ यत्किंचितही शरीराची हालचाल न होता आणि उद्वेग उत्पन्न न करणारी अशी जी शरीराची बैठक तिला आसन म्हणतात.
'आस्यतेनेनेति आसनम् तद्यदा स्थिरं निष्कम्पं सुखमनुद्वेजनीयं च भवति तदायोगांगतां भजते।'
प्रयत्नशैथिल्यानन्तसमापत्तिभ्याम्।।४७।।
वर सूत्र ४६ मध्ये आसनाचे जे लक्षण सांगितले आहे त्या प्रकारच्या आसनाची सिद्धी होण्यासाठी दोन गोष्टींची जरुरी आहे. एक प्रयत्नाची शिथिलता.प्रयत्न म्हणजे शरीराचे हालचाल करण्याचे यत्न पूर्णतःथांबविणे. दुसरी म्हणजे अनन्ताशी समापत्ती अर्थ एकोपा, जुळणी असा आहे. विराट असे जे ईश्वराचे रुप आहे त्याशी जुळण्याचा प्रयत्न;यामुळे आसन लवकर सिद्ध होते.'प्रयत्नशैथिल्यं बहुलायास निवृत्तिः। अनन्तसमापत्तिश्च भगवति चित्तस्थ धारणम्: ताभ्यामासनं सिध्यतीत्यर्थः।'
ततो द्वन्द्वानभिघातः।।४८।।
आसन जय प्राप्त झाल्यावर शीतोष्णादिक त्रास देणारी जी द्वन्द्वात्मक दुःखे आहेत त्यांचा सहज पराभव होतो.
तस्मिन्सति श्वासप्रश्वासयोर्गतिविच्छेः प्राणायामः।।४९।।
आसन झाल्यानंतर श्वास (बाहेरचा वायू नाकपुडी द्वारे आत घेणे) व प्रश्वास (एकदा आत घेतलेला वायू बाहेर सोडणे) या दोन्ही गतिंचा विच्छेद करणे (म्हणजेच प्राणाचा अंतर व बाह्य कुम्भक करणे) यास प्राणायाम म्हणतात.
बाह्याभ्यन्तरस्तम्भवृत्तिर्देशकालसंख्याभिः परिदृष्टो दीर्घसूक्ष्मः।।५०।।
बाह्यवृत्तिश्वास म्हणजे रेचक; अभ्सन्तरवृत्तिश्वास म्हणजे पूरक ; स्तम्भवृत्तिश्वास म्हणजे कुम्भक.अशा रीतीने प्राणायम तीन प्रकारचा आहे. हा प्राणायम देश , काल व संख्या या मोजणीने दीर्घ वा सूक्ष्म होतो.'देशेन उपलक्षित' प्राणायम म्हणजे बारा अंगुले अथवा एक हात (भर) पर्यंतच जो वेगाने जाईल अशा बेतानेच बाहेर सोडलेला श्वास.'कालोपलक्षित' प्राणायम आहे. 'संख्यालक्षित' म्हणजे प्राणायम इतके वेळा करणे ही जी मर्यादा हिला 'संख्यालक्षित' प्राणायाम म्हणतात. अशा रीतीने प्राणायाम केला म्हणजे दीर्घ (बराच काळ जेथे कुम्भक असतो असा) होतो व प्राण हा अगदी सूक्ष्म गतिमान होतो.
'इयतो वारान्कृत एतावद्धिः श्वासप्रश्वासैः प्रथम उद् घातो भवति। एतज्ज्ञानाय संख्याग्रहणमुपात्तम्। उद्र्घातो नाम नाभिमूलात्पेरितस्य वायोः शिरस्यभिहननम्।'
बाह्याभ्यन्तरविषयाक्षेपी चतुर्थः।।५१।।
बाह्य, आभ्यन्तर, विषय, आक्षेपी अर्थात बाह्य व आतील विषयांना त्यांची आलोचना करुन फेकणारा (आक्षेपी) हा चौथा प्राणायाम. सूत्र ५० मध्ये पूरक,कुम्भक व रेचक अशा तीन वृत्ती प्राणवायूच्या असतात असे सांगितले. या सूत्राने कुम्भकाचे आन्तर कुम्भक व बाह्य कुम्भक असे दोन विभाग केले व प्राणाच्या चार वृत्ती सांगितल्या  त्या चार वृत्ती अशा-पूरक ही प्राणाची पहिली वृत्ती. याने प्राणवायू आत जातो. आन्तर कुम्भक ही प्राणाची दुसरी वृत्ती. दुष्ट विषय वायू बाहेर पडतो यास रेचक म्हणतात, ही प्राणाची तिसरी वृत्ती. या वृत्तिने योगी माणसास राजस व तामस आहार आवडत नाही. एका योगी पुरुषाने सांगितले की दोन केळी व अर्धा लिटर दूध हा योग्याचा एक वेळचा पूर्ण आहार आहे. योगी प्रामुख्याने फलहारी असतो. बाह्य कुम्भक या धारणेच्या अपेक्षेने अपेक्षेने असलेली प्राणाची प्रक्रिया ही प्राणाची चौथी वृत्ती.
ततः क्षीयते प्रकाशावरणम्।।५२।।
ततः म्हणजे प्राणायामाच्या अभ्यासाने प्रकाशावरणम्- अज्ञान, क्षीयते- नष्ट होते. प्राणायामाच्या अभ्यासाने चित्ताचा जो सत्त्वगुणरुपी प्रकाश त्यावरील अविद्य, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या क्लेशमूलक आवरणांचा क्षय होतो.'प्राणायामस्थैर्यात्प्रकाश विवेकज्ञानस्यावारकं कर्मादृष्टरुपं क्षायते।'
धारणासु च योग्यता मनसः।।५३।।
प्राणायामामुळे जेव्हा सर्व दोष क्षीण होतात तेव्हा मनाची 'धारणा' या अंगामध्ये स्थिर होण्याची भूमिक होते. 'क्षीणदोषमनः यत्र यत्र धार्यते तत्र तत्र स्थिरी भवति न विक्षेपं भजते।'
स्वाविषयासम्प्रयोगे चित्तस्य स्वरुपानुकारेवेन्द्रियाणां प्रत्याहार।।५४।।
इन्द्रियांचा त्यांच्या स्वतःच्या विषयाशी जो असंप्रयोग (संबंध नसणे) व त्यामुळे इन्द्रियांनी चित्ताच्या स्वरुपाचा आकार धारण करणे म्हणजे चित्ताचे जे स्वरुप ते स्वरुपच इन्द्रियांच्या धारणेचा विषय होणे यास प्रत्याहार म्हणतात.
ततः परमावश्यतेन्द्रियाणाम्।।५५।।
प्रत्याहाराच्या अभ्यासामुळे इन्द्रिये आत्यान्तिक वश होतात.अभ्यस्यमाने हि प्रत्याहारे तथा वश्यान्यायत्तानीन्द्रियाणि सम्पद्यन्ते यथा बाह्यविषयाभिमुखतां नीयमानान्यपि न यान्तीत्यर्थः।
येथे पातञ्जल योगसूत्राचा द्वितीयोध्याय समाप्त झाला.
---------------------------------------------------------------------------------

कोई टिप्पणी नहीं: