मंगलवार, 6 सितंबर 2016

इम्युएल कान्ट चे तत्वज्ञान --- अग्निहोत्री अपूर्ण


मधुमंगेश कर्णिक मु.पो- करुळ
२०.०६.२००८ C/O कनकवली
(व्हाया फोंडाघाट)
जिल्हा सिंधुदुर्ग-४१६६०१.
प्रति,
लीना मेहेंदळे,
सप्रेम नमस्कार,
------
-------
-----------------------------------------------------------------------------
इम्युएल कान्ट हा जर्मन राष्ट्रातील महान तत्वतेत्ता होता. याचा जन्म कोनींग्जबर्ग मध्ये २२.४.१७२४ मध्ये झाला. याचा मृत्यु १२.२.१८०४ तर दफन विधि २८.२.१८०४ मध्ये झाला. तत्वज्ञान, नितीज्ञान, धर्मज्ञान असे तीन भाग कान्टच्या शिकवणुकीचे केले जातील. मणुष्य हाच एक असा आहे की, ज्याला शिक्षित करता येते ज्यायोगे जगाकडे व स्वतःकडे पहाण्याची त्याची स्वतंत्र्य दृष्टी राहील. जनावरे शिकतात हत्ती घोडे व्याघ्र कुत्रे सर्व मानसाळलेले प्राणी शिकतात पण या शिक्षणाने त्यांच्यात आज्ञाधारकते पेक्षा स्वतंत्र आध्यात्मीक बैठक तयार होत नाही. पण मणुष्यास शिक्षित केल्याने नैतिक बैध्दीक व अध्यात्मीक पातळी वाढुन त्याला स्वयंनिश्चय व निर्णयाची जाणीव होते. कान्ट च्या दृष्टीने शिक्षणाने नैतिक पातळी उंचावते योग्य अयोग्य काय याचा निर्णय करण्याची बुध्दी येते. व ज्याला मुलभूत मुल्य आहे ते जानण्याची व ग्रहन करण्याची पात्रता येते. मणुष्याची व्यवहारीक पात्रता त्याच्या नैतीक मुल्यांवर अवलंबून आहे. कान्टच्या मते ज्यात उच्च धेय्य आहे त्याकडे त्याचा कल गेला पाहीजे नाहीतर पुरुषपज्ञोश्च पशोश्च को विशेषः। यासाठी कान्टने एक सार्वभौम नियम केला की, अशा रितीने माणसाने वर्तण केले पाहीजे ज्यायोगे त्याच्या वागणुकीचा सर्वसामाण्य नियम बनु शकेल(Act in such a way that by thier action in ,,,,,,) नैतीक वर्तन हा कर्तव्य श्रेष्ठते पासुन होतो. कर्तव्यश्रेष्ठता, सदसद्विवेक बुध्दीने निर्माण होनारा आज्ञाधारक पणा, सत्यधिलता, सामाजिक बाधिलकी याचा अंतर्भाव होतो. समाज आहे व माणसाला एकमेकांनविषयी प्रेम व आपुलकी आहे म्हणून नैतिकता आहे व यासाठी माणसाच्या वागणुकीत एकसुत्रीपणा पाहीजे.(Charactor..............)
कान्ट च्या मते धर्म याचा अर्थ नैतीक मुल्यांपासुन इश्वर प्राप्ती करुन घेणे. नैतिक आधिष्ठानाशिवाय ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. गीतेत म्हणले आहे की, दैवी संपत् विमोक्षाय् अश्वत निबन्धाया सुरीमता। ईश्वर प्राप्ती साठी आपली नैतिक पातळी उंचावने हाच एकमेव मार्ग आहे.
कान्ट च्या तत्वज्ञानानुसार दुसरा भाग जाणीव संबंधी आहे. बुध्दीच्या संबंधी जाणीव. अणुभव व समाज असे तीन भाग पडू शकतात. जाणिव याचा अर्थ संशयरहीत (अर्थात अत्यत गरजेचा Necessary) निर्णय. सर्व जाणिव निर्णय स्वरुपात प्रकट होते. पण हे निर्णय आत्मनिष्ठ असतात. खोलीत शिरल्यावर कोणास ही खोली गरम भासेल तर कोणास थंड भासेल. कान्ट च्या मते निर्णय हा वस्तुनिष्ठ अर्थात अबाधित असावा. त्रिकोनाच्या तीन कोनांची बेरीज १८० अंश इतकी आहे हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. मग तो त्रिकोण कोणत्याही आकारात असो. त्याला अनुभवाची गरज नाही. एका चौरस शेताच्या एका टोकापासुन त्याच्या विरुध्द टोकाकडे जाण्यासाठी तो मधला मार्ग किंवा जवळचा मार्ग म्हणुन स्विकारतो यात त्याला त्रिकोनाच्या दोन बाजुंची बेरीज त्रिकोणाच्या तीसर्या बाजुपेक्षा अधिक असते. या सिध्दांताची या अणुभवाची गरज नसते. हे त्याचे उपजत व वस्तुनिष्ठ ज्ञान असते. यावरुन वस्तुनिष्ठ() ज्ञान हे एकाएकी होत नाही. आपणास जे साधारण ज्ञान होते ते इंद्रियजन्य व बुध्दीजन्य ज्ञान होते व हे ज्ञान अवकाश व समय याने सिमित झालेले असते.  अवकाश अधिक समय() याने उत्पन्न ते ज्ञान ते वस्तुनिष्ठ नसुन आत्मज्ञान आहे. पण अवकाश व समय हे अबाधित आहेत. म्हणून वस्तुचे ज्ञान अर्थात जाणिवेत येण्यासाठी अवकाश व समय या पलीकडे जे वस्तुनिष्ठ ज्ञान प्रत्येकाने केल्यास ते वस्तुनिष्ठ न रहाता जाणीव स्वरुपाची होते म्हणजेच हे ज्ञान काहीसे गौडपदाचार्य यांनी वर्णन केल्या प्रमाणे वाटते.
चित्तस्पन्दित्तयेणेदं ग्राह्यग्राहकमद्वयम् चित्तंनिर्विषयतीत्व ,,,,, म्हणून अनुभव विरहीत शुध्द जाणीव हीच मुळात असते. या जाणीवेतुनच एकात्म असलेल्या आत्म्याची जाणीव होते. कान्ट म्हणतो There must be primitive ..... जाणीव हीच इंद्रीय जन्य ज्ञानाच्या पलीकडे असलेल्या वस्तुनिष्ठ वेशी वादात्म्य घडवुन आणते. वस्तु ही सच्चीदानंद अनंत आद्यब्रम्ह आहे. कान्ट म्हणतो, Awareness of the ....


कान्ट चा ईश्वर वाद

कान्टच्या मते ब्रम्हजगत(ज्याचा भास इंद्रीयजन्य ज्ञानाने होतो) व अंतर जगत निश्चित काही तरी संबंध आहे, शंकराचार्य यांच्या मते बाह्य जगत आभास असुन (आभास एव च्) आत्मा हाच सत्य अद्वय अनंत ब्रम्ह आहे. रामाणुजांच्या मते परमात्मा हा अंतर्यामी असुन बाह्य जगत हे त्याचे शरिर आहे. शंकराचार्यांच्या मते आत्मा, जीव हा बृहत् परीणाम आहे तर रामाणुज चार्यांच्या मते आत्मा,जीव हा अणु परिणाम आहे. कान्ट च्या राष्टीयत्व अणुभाविक ज्ञानापलीकडे एक अशी वस्तु आहे जी देवता वादाने पाहील्यास ईश्वर आहे व तत्वज्ञानाच्या हेतुने पाहील्यास ज्ञानस्वरुप आत्मा आहे. अंन्तस्थ व बाह्य जगत मिळुन होतो जो अंतरआत्मा व जगत यांना एकरुप करतो (The ........) कारण वादातुन पहीले तरी इश्वर वाद मानावाच लागतो. The nation of ...... जगत् याचा अर्थच असा की त्याला मर्यादा आहे. व या मर्यादीत दृश्यापलीकडे रेशील अमर्याद हे तत्व आहे- मर्यादाम्ह
-----------------------------------------------------------------------------------------------
Kent for Energy Man - By Klimnke च्या आधारे.